MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Thursday, December 8, 2011

Why this, मी का वाया घालवतोय?


 Why this, मी का ... ... वाया घालवतोय? अर्थात, मेंदू पोखरणारा भुंगा.


Hi, boys and girls,
I ‘m singing a song,
                                                            (दुसरा काही उद्योग नाही काय रे?)
Why this, Why this, Why I’m listening Dis?
Why this, Why this, Why I’m listening Dis?
                                                            (Rhythm correct?)
                              (Correct. But is this a song?)
Poem-u lyric-u trash-u trash-u
Music-u bad-u bad-u … … …
(really bad music yaar)
Then Why this, …
                                                (Maintain this bad music)
Drilling-u hammering-u मेरा head-di

Tune-u ghissi – a – pitti – a tune-u
Theme-u ol’ .. n Song-u Flopp-u
                                                            (as it is said, and rightly said)
Why this, Why mere नशिबात देवा Dis?    

Brain-u smashing – a – mashing – a – frying  
फिर भी listening-u torture-u – self-u
            Why --- --- why --- --- why --- Daka Dhaka Dhis!

Ka Ka Ku Koooo, Ki Kee Ke Kaeeee,
त्याने काऽऽस्वाशी पैज लाविलीऽऽ
Ko Kau Kam Kaha, Ko Kau Kam काऽ ही
शर्यत रे ऽऽ अपुली ऽऽ  --- --- --- हा हा हा हा!
Why this, why … … … --- --- --- … … … ing this?

But why I’m writing-u this-u this-u
Wasting-u time-u time-u … … …
Why this, Why this, Why I’m listening Dis?
Why this, Why this, Why people r listening this?

Friday, July 1, 2011

“अमिताभ-आजोबा” या सुलभाच्या लेखाच्या निमित्ताने –


तुझा राग योग्यच आहे आणि या लेखात तो चांगलाच व्यक्त झाला आहे.
हे वाचताना मला मला प्रहार सिनेमाची आठवण झाली. अगर ये तुम्हारा बच्चा होता तो? वो देखो, तुम्हारा बच्चा सडकपर पैदा हुवा और पैदा होतेही मर गया असं काहीतरी नाना रागाने म्हणतो, त्या प्रकाराने तुझाही राग व्यक्त झाला आहे.
अमिताभला सगळे ओळखतात, त्याच्यावर सगळे प्रेम करतात. तो जणू आपल्या कुटुंबाचाच भाग आहे असं सगळ्यांना वाटतं. (म्हणून तर आपण त्याला, नानाला, प्रेमाने अरे-तुरे म्हणतो.) याची जाणीव ठेऊन त्यानं आपली खाजगी गोष्ट आपल्याला सांगितली. स्वतःचा आनंद आपल्याबरोबर वाटला. या बातमीचं स्वागत आपणही चांगल्या प्रकारे करू, आपल्यालाही त्याच्याइतकाच आनंद होईल असं त्याला वाटलं असणार. तो स्वतः अत्यंत सुसंस्कृत असल्यानं याच सुसंस्कृतपणाची अपेक्षा त्यानं आपल्याकडून ठेवली असणार.
दुर्दैवानं आपण इतके सुसंस्कृत नाही, इतकेच नव्हे तर अशा गोष्टीवर सट्टा लावण्याइतके विकृत आहोत, हेच आपण दाखवून दिले. पाच हजार वर्षांच्या हिंदु संस्कृतीचा अभिमान सांगणारे आपण दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानण्याइतकासुद्धा सुसंस्कृतपणा दाखवू शकत नाही.
सट्टा चालवणार्‍यांच्याबद्दल आपल्या काही अपेक्षा नाहीत व त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचेही नाही. पण लोक खेळत नसतील तर अशा गोष्टींवर कोण सट्टा चालवू शकेल?
अशा गोष्टींवर थोड्या पैशांसाठी सट्टा खेळणारे लाखो-करोडो विकृत लोक ज्या समाजात आहेत त्या समाजाबद्दल काय बोलायचे? आणि मुलगा-मुलगी बघून मुलींना गर्भावस्थेतच मारायचं या सार्वत्रिक महा-विकृत मानसिकतेपेक्षा व खुनी कृतीपेक्षा सट्टा खेळणं ही किरकोळ बाब आहे.
अशा समाजात, अशा काळात अमिताभला राहावे लागते व त्याच्या नातीला/नातवाला जन्म घ्यावा लागतो हे त्यांचं दुर्दैव.  

Thursday, June 30, 2011

अमिताभ- आजोबा

अमिताभ- आजोबा

साधारण एप्रीलमध्ये मला कळले की मी आजी होणार आहे. मग काय? माझा आनंद मनात, गगनात कुठेच मावेना. तो व्यक्त कसा करू? हेही कळेना. जोरजोरात ओरडावं, मोठमोठयानं हसावं, गावं, नाचावं असं वाटलं. पण मी पडले बाई! हे कसं काय़ करणार? आता काय करावं? शेवटी मी आपल्या ३०/४० मैत्रीणींना फोन केले, ५० नातेवाईकांना पत्रे लिहिली. असा मी

माझा आनंद व्यक्त केला. चौकात मोठा फ्लेक्स बोर्ड पण लावणार होते. पण तो नाही लावला. मला न ओळखणार्‍यांना माझ्या आनंदाचं काय?

आता आपला अमिताभ पण माझ्यासारखाच. त्यालाही नुकतचं कळलं की तो आजोबा होणार आहे. त्याला ही खूप आनंद झाला असणार. पण आता अमिताभ मोठा [अर्थात त्याला कोण ओळखत नाही?] तेव्हा त्याचा आनंद ही तितकाच मोठा. मी ही माझी आनंदाची बातमी मला ओळखणार्‍या लोकांपर्यंत पोहचवली.पण अमिताभला वाटले असणार की हा त्याचा खूप मोठा आनंद ज्या लोकांना तो ओळखत ही नाही, पण जे त्याला ओळखतात, त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहचवावा.

मग त्यानं काय केलं? उचलला लॅपटॉप आणि टाकला ब्लॉग. त्याची प ही बातमी वाचून मी परत एकदा खूष झाले. आपल्या घरातच आनंदाची बातमी असल्यासारखं वाटलं. त्याला जे ओळखतात, आपला मानतात, ते सर्वच खुष झाले असणार.

पण त्याही पेक्षा आणखी आनंदाची बातमी मला काल सकाळी कळली की ऐश्वर्याला मुलगा होणार की मुलगी? ह्यावर लोकांनी पैजा लावायला, पैसे लावायला सुरुवात केली. मला पुन्हा एकदा बेहद्द आनंद झाला. त्या प्रीत्यर्थ आता मात्र मी लगेच फ्लेक्स बोर्ड करायला टाकला. मी पण लगेच ह्या बातमीवर पैसे लावायाचे ठरविले.

पण आता आली पंचाईत. कारण ऐश्वर्याला मुलगा झाला की मुलगी हे कळायला तब्बल ५-६ महीने वाट पहावी लागणार, त्या नंतर पैसे मिळणार. शी! एवढा वेळ आहे कोणाजवळ? त्या पेक्षा झटपट पैसे देणारी आणखी एक आयडीया आहे माझ्या जवळ. ह्या पेक्षा ही जास्त भरवशाची आणि मुख्य म्हणजे खूप लवकर पैसे देणारी.

शेजारच्या गल्लीतील एक आजोबा गेले ६ महिने अंथरुणावर खितपत पडले आहेत.अगदी केव्हाही चौदाव्याचे लाडू खाण्याचा योग आहे. फार वाट मुळीच बघावी लागणार नाही. आज जातील का उद्या जातील? यावर पैसे लावले की लगेच परत मिळणार ह्याची खात्री आहे. आजोबांचे पैसे परत मिळाले की लगेच माझ्या मैत्रीणीची काकू केमोथेरपी घेत आहेच तिला आपण अजेंडावर आणू. पाठोपाठ आशाताईच्या सद्ध्या बर्‍याच टेस्टस सुरू आहेत असं कळलं आहे. बघते, त्यावर पैसे लावायला काही आशा, hopes आहेत का ते? नाही तर आपण नवा गडी शोधू त्यात काय एवढं? कोणाची व्यक्तिगत, खाजगी गोष्ट असली काय, आनंदाची बातमी काय किंवा दुःखाची काय, आपल्याला काय त्याचं? आपल्याला चघळायला बातमी मिळण्याशी आणि झटपट आणि भरपूर पैसे मिळण्याशी मतलब.

मग चला लवकर लवकर पैसे लावायला लागा. आपल्याला वेळ आहे कुठे वाया घालवायला?

Monday, March 21, 2011

होळी

होळी

सण साजरे करायला आपल्याला आवडतं. इतकं, की सण आणि धार्मिक उत्सव म्हटलं की त्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही (भावना दुखावतात) असं आपण ठरवलेलं आहे. त्या दिवशी काहीही करायचा परवानाच आपल्याला मिळालेला आहे. शिवाय आपण हिंदू असल्यानं सहीष्णू आहोत आणि आपलं राष्ट्र निधर्मी आहे. त्यामुळे सर्वांचे सण आपलेच आहेत आणि आपण इतके रिकामटेकडे आहोत की रोज सण साजरे करायला मिळाले तरी आपल्याला आवडेल.
सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव लोकमान्यांनी काय हेतूनं चालू केले आणि ते साजरे करण्याबद्दल त्यांच्या काय कल्पना होत्या याचं आज आपल्याला कोणालाच सोयर-सुतक उरलेलं नाही. कालमानाप्रमाणे उत्सव साजरे करण्याच्या कल्पना बदलायला ह्व्यात हे बरोबर असलं तरी त्याचा अर्थ उत्सवांचं स्वरूप जास्त-जास्त विकृत करत न्यायला हवं असा होत नाही.
आज गणेशोत्सवाचा काय आणि किती राडा झाला आहे हे वेगळं सांगायला नको. पण हेसुद्धा आपल्याला मान्य करायचं नाही. हे तर उलट आपल्या सगळ्यांना आवडतंच आहे. सगळ्यांसाठीच तर हे चाललं आहे. सगळ्यांनाच जास्त-जास्त (कान फाटेपर्यंत) कर्कश्श आवाजात गणपतीच्या नावाखाली आयटेम सॉंग्ज ऐकायची आहेत आणि त्यावर विकृत हावभाव करून नाचायचं आहे. पण शेवटी आयटेम सॉंग्ज हीही उच्च गायनकलाच आहे आणि हावभाव विकृत कुठे आहेत? (उलट काही लोकांची दृष्टी विकृत झाली आहे.) सगळ्यांनाच लोकांच्या (म्हणजे कुणाच्या?) पैशातून प्रसाद खायचा आहे. सगळ्यांनाच लोकांच्या पैशानं चैन करायची आहे. सगळ्यांनाच गणपतीच्या सोंडेनं दारू प्यायची आहे. सगळ्यांनाच गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवा करायची आहे. सगळ्यांनाच एकाहून एक मोठ्‍ठ्या गणपतीच्या मूर्तीच्या पोटाएवढ्या पोटांत पैसे खायचे आहेत. शिवाय सगळ्यांनाच उत्सवाचे प्रायोजक होऊन जाहिराती करून दिलेल्या पैशांच्या हजारपट पैसे ओढायचे आहेत. सगळ्यांनाच मिरवणुकीत ...
हे कमीच पडतंय. म्हणून लगेच नवरात्री उत्सव आणि दांडिया!  
शिवजयंतीचा प्रकार वेगळाच आहे. शिवरायांच्या जन्मतिथीबद्दल (व तारखेबद्दल) मतभेद असणं वेगळं आणि त्याचं निमित्त करून चार वेळा उत्सव करून उच्छाद मांडणं वेगळं. शिवाय कोण कशाकरता मशाली घेऊन कुठे धावतात हेच कुणालाच समजत नाही. आपल्याकडे इतकं तरुण रक्त उपलब्ध आहे म्हणून आनंद मानायचा, का ते असं महिनोन्‌ महीने धावून रस्त्यांवर भळभळ वाहून वाया जातंय याचं दःख करायचं, हेच कळेनासं झालंय. शिवाय इतकं धावून धावून कुठल्याही मॅरॅथॉनमधे बक्षिस नाहीच!
दिवाळीमधे फटाक्यांचे आवाज आणि शोभेच्या दारूचा धूर वाढतोच आहे. फुकट मिळालेल्या मिठायांनी पोटं सुटतातच आहेत. सोन्याच्या कींमतीबरोबरच सोन्याच्या दुकानांची आणि खरेदीदारांची संख्याही वाढतेच आहे. शहरांतली रोषणाई आणि झगमगाट वाढतोच आहे. वीज-टंचाई आहेच कुठं!? दिवाळी, ख्रिसमस आणि इतर सणांची, वाढदिवसांची गिफ्ट्‍स, रिटर्न गिफ्ट्‍स आणि भेटकार्डांचं प्रस्थ वाढतंच आहे.
न्यू इयरबद्दल बोलायलाच नको. जाणार्‍या वर्षाचं दःख आणि येणार्‍या वर्षाचा आनंद यांचा एकत्र मिलाफ झाल्यावर कुणाला भान राहील? सगळे "रम"णारच!
हे सगळं खरंच आपल्याला सगळ्यांना हवंय, का हे काहीच हितसंबंधियांना हवंय्‌ आणि म्हणून, "हेच आपल्याला हवं असायला पाहिजे" अशी सक्ती केली जाते आहे?   
नेत्यांच्या जयंत्या आणि वाढदिवस हे नव-सण निर्माण झाले आहेत. त्यात इतर गोष्टींबरोबरच मोठे फ्लेक्स बोर्ड लावून निष्ठा दाखवण्याची स्पर्धा लागली आहे.   
जत्रा म्हणजे तर देवाच्या नावाखाली, देवाच्या नावानं सोडलेल्या वळूंसारखं, दारू पिऊन, मोटारसायकलींवरून गावोगाव मटणाच्या पार्ट्या झोडत महिना-दोन महिने सुसाट उंडारायचं/ भटकायचं असंच आपण ठरवलेलं आहे.
हे पाहिल्यावर आपला देश गरीब आहे; बेकारी, भूक, रोगराई हे आपल्यापुढचे प्रश्न आहेत; साधनसंपत्ती, वीज, पाणी, अन्न या गोष्टींची आपल्या देशात कमतरता आहे असं काही लोक म्हणतात त्यावर विश्वासच बसत नाही.  
स्वतःच्या बहिणीकडून राखी पौर्णिमेला राखी (दुबळ्या मनगटापेक्षा मोठी) बांधून घेतली की व्हॅलेंटाईन डेला इतरांच्या बहिणींना लाल गुलाब द्यायला आपण मोकळे. मग उरलेलं वर्षभर त्यांच्यावर (इतरांच्या बहिणी) एकतर्फी प्रेम करताना त्यांच्यावर अ‍ॅसिड ओतणे, बलात्कार करणे किंवा खून करणे अशा गोष्टी घडणारच! वर्षभराच्या या कर्तृत्वासाठी भाऊबीजेला आपण बहिणींकडून (आपल्या) पुन्हा ओवाळून घेणार.
हे सगळं आता मनात येण्याचं कारण म्हणजे आता होळी, मग धूलिवंदन आणि नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी. (भारतीय एकात्मतेमुळे आता आपण तिनही दिवशी रंग खेळतो). या दिवशी आपण कोणकोणते रंग उधळणार आहोत?.
जंगलांची कत्तल आणि लाकडांची चोरी करून आणि सक्तीची वर्गणी काढून जमवलेल्या लाकडांची होळी करून लोकांच्या नावानं बोंबा मारणं ही आपली होळीसंबंधी कल्पना आहे. हे पुरेसं नाही म्हणून जंगलांना एकदमच वणवे लावून मोठ्या प्रमाणात होळी केली की एक-एक लाकडाचा तुकडा जाळण्याची कटकट नको. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत एकदा सगळे डोंगर जाळून झाले की आपल्या जिवाला शांती आणि गारवा मिळणार. 
धूलिवंदनाचीपण आपण धुलवड करून टाकली आहे. ज्या मातीतून आपण जन्मलो तिला वंदन करून, तिचा रंग कपाळाला लावून तिच्या रंगात रंगण्याच्या ऐवजी राडा करून गाढवासारखे लोळण्यातच आपल्याला मजा वाटते. रंगपंचमीला तर तोंडाला काळे फासून भुतासारखे बोंबलत हिंडंण्यात आणि इतरांच्या अंगावर चिखल उडवण्यातच आपल्याला विकृत आनंद होतो.
रोज एक सण आहेच आणि आपण तो, सगळं जीवन पणाला लावून, तोंडाला फेस येईपर्यंत धिंगाणा घालून, साजरा करत आहोत. 
एवढ्या कशाच्या उन्मादानं आपल्याला एवढी झिंग आली आहे?
असो. आपली जेवढी लायकी तसेच आपण वागणार आणि तीच आणि तशीच आपली संस्कृती. त्यात आपली संस्कृती सर्वसमावेशक असल्याने सगळी घाण आपण पोटात घेणार. 
कुठल्याही सणाच्या आनंदाचं उन्मादात; उत्साहाचं चेकाळण्यात; रंगाचं बेरंगात; गाण्याचं किंचाळण्यात; नाचाचं धिंगाण्यात; सुग्रास जेवणाचं काल्यात; आनंदानं खाण्याचं आधाशीपणे तुटून पडून हादडण्यात; उल्हासाचं फाल्गुनमासात आणि संस्कृतीचं हिडीस आदिम रानटीपणात रूपांतर करायला आपण कसे आणि कधी शिकलो? 
काहीही का असेना, आपण शिकतोय हे महत्त्वाचं! असंही काहींना वाटतं. 

जगात इतके रंग आहेत ते चंगळवादाच्या चिखलात डोकं खुपसल्यावर कसे दिसणार? संवेदना बधीर करणार्‍या नशेतून जागं झालो तर आपल्याला जीवनाचा आस्वाद घेता येईल आणि चांगल्या विचारांच्या प्रकाशात जीवन उजळून टाकलं तर ते सप्तरंगांत न्हाऊन निघेल. 

Tuesday, March 8, 2011

माणूस आणि चिमणी - ४

माणूस आणि चिमणी - ४


एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती एकदम दिसेनाशी झाली.
भोवती भुर्रर्रर्र नाही, अंगणात चिवचिव नाही, घरटं बांधताना घरभर पडलेल्या काड्या नाहीत. घरटं बांधायला घरात जागाच नाही. आणि भिंतीवर आजी-आजोबा आणि देवांचे फोटोही नाहीत.
आता घरातल्या बाळाला चिऊची गोष्ट सांगताना दाखवायला चिऊच नाही.
ती त्याच्या आयुष्याचा भाग होती आणि त्याच्या अस्तित्वाचा लचका तोडल्यासारखी ती दिसेनाशी झाली.
हे कधीपासून झालं? आणि का?
ती मोकळी आणि स्वतंत्र पाखरं! त्यांना माणसानं हात का लावला?
त्याला खरंच काही माहीत नव्हतं, तो डोळेझाक करत होता का तो सोंग करत होता?
काहीच न कळण्याएवढा तो मूर्ख, मद्दड होता, का काही कळून घ्यायचेच नाही इतका तो बथ्थड आणि हेकट होता? 
का कळूनही कळत नाहीसे दाखवणारा ढोंगी आणि स्वार्थी होता?
एक माणूस होता पण आता एक चिऊ नव्हतीच.

एक माणूस होता. पण एक चिऊ नव्हतीच.
आणि कशी असेल? घराभोवती अंगण नव्हतं, गॅलरीतल्या कुंडीत खुरटे गुलाब होते पण झाडं-झुडुपं नव्हती. घरात वळचणी, अडगळीच्या जागा, तसबीरी नव्हत्या. घरात चिमण्यांना टाकायला दाणेसुद्धा नव्हते. मॉलमधून आणलेली तयार आट्याची किंवा तयार पोळ्यांची पाकिटं होती. आणि मुख्य म्हणजे दाणे टाकायला छोटे हातही नव्हते.
काऊ कसेबसे कुठेतरी, काहीही खाऊन, राहिले होते. पण पोपट, मैना, बुलबुलही कुठे होते? आणि त्यांच्यासाठी झाडं, फळं, फुलंही कुठं होती? आणि लबाड कोल्हा, दुष्ट लांडगा, बाघोबा आणि जंगलचा राजा कुठं होते?

एक माणूस होता. तो आता आजोबा झाला.
नातीला घेऊन, टीव्हीपुढ्च्या खुर्चीवर बसून मॅगी खाताना तो तिला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगे. आधी ती छान ऐकून घेई. मग एकदा तिनं चिऊ म्हणजे काय? चिऊ कुठे? म्हणून विचारलं. मग त्यानं त्या गोष्टी सांगणंच बंद केलं. तिनं विचारला नव्हता, पण तीन पिढ्यांच्या अनेक अपराधांचा जाब तिला देणं त्याला शक्य झालं नाही.
आता तो तिला माऊ-भूभूच्या गोष्टी सांगतो; टायगररमॅन, फाल्कनमॅन, स्पायडरमॅन, फ्रॉगमॅन, व्हेलमॅन, वेअरवुल्फ, वगैरेंची कॉमिक्स वाचून दाखवतो किंवा सुपरमॅन-मंकीमॅन, झोबो-टोबो- रोबोच्या करामतींनी तिला हसवायचा प्रयत्न करतो. काहीच नाही तर कार्टून नेटवर्क आहेच.

एक माणूस होता. पण भयाण, उजाड जगात तो एकटाच होता.
का तो पण नव्हता?

Monday, March 7, 2011

माणूस आणि चिमणी - ३


माणूस आणि चिमणी - ३ 

एक माणूस आणि एक चिऊ.
ती त्याला कॉलेजमधे भेटली. नाचर्‍या डोळ्यांची, उडत्या केसांची, भरारत्या मनाची. सतत भिरभिरणारी, चिवचिवणारी. चिमणा-चिमणीच्या गोष्टीतली चिमणी.
आणि मग तो चिमणा? तिच्या अवतीभोवती भिरभिरणारा? ...त्यांनी मिळून घरटं बांधायचं?
चिमणीलाही तसंच वाटत होतं का?
ते त्याला माहीत नव्हतं. असा त्यानं कधी विचारच केला नव्हता.
त्याला काहीच कळत नव्हतं.

एक तो आणि एक ती.
ती चिऊ आणि तो ... काऊ?
ती बाळाला जपणरी, खाऊ घालणारी, नीटनेटकं ठेवणारी, वाढवणारी, ती सर्वांची (त्याची सुद्धा) काळजी घेणारी, घर सांभाळणारी.      
तो भटकणारा, उंडारणारा, घर शेणाचंही चालणारा. खा-खा खाणारा आणि सगळीकडे घाण करणारा. अवेळी दार ठोठवणारा. स्वतः काही न करता इतरांकडून अपेक्षा ठेवणारा.
त्यांची जोडी का जमली? कोणी जमवली?
पण खूपदा असंच असतं.
हे त्याला माहीत नव्हतं. तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
पण अशी गोष्ट नको असं त्याला वाटे.

एक तो आणि एक ती. तो चिमणा आणि ती चिमणी.
चिमणा म्हणाला, आपण दोघं घर बांधू. चिमणी म्हणाली, का? चिमणा म्हणाला, असंच. मग चिमणी म्हणाली, चालेल.
मग चिमण्यानं एक गवताची काडी आणली, चिमणीनं एक काडी आणली.
चिमणा म्हणाला, किती दमलीस, मी आणतो काड्या. चिमणी म्हणाली, किती दमलास, मी बांधते घरटं. दोघांनी मिळून एक घरटं बांधलं.
मग चिमण्यानं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला, चिमणीनं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला. चिमणा भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आला, चिमणी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आली. दोघांनी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन आणखी एक-एक दाणा आणला. ते म्हणाले, हा आपल्या पिल्लांसाठी.

मग घरट्यात एक चिमणी चिमणी आली. तिला वाढवण्यात, तिच्यासाठी दाणे आणण्यात दिवस पुरेनासा झाला. तिला छोटे पंख फुटल्यावर ती घरभर उडत असे. दिवसभर तिचा अखंड चिवचिवाट चाले. तिच्यामुळे घर भरलेले असे. तिच्यामुळे घर घर असे. तिच्यामुळे सगळ्याला अर्थ असे. असे किती दिवस भरभर उलटले कळलेच नाही.
तिचे पंख मोठे झाले. तिची झेप मोठी झाली. घरटे तिला पुरेनासे झाले. तिला आकाशही पुरेनासे झाले. तिचा चिमणा दिसल्यावर ती त्याच्याबरोबर मोठ्या आकाशात उडून गेली.
ती घरट्यात असतानाही, नंतर उडून जाताना आणि उडून गेल्यावर जीव कासावीस झाला. आनंदानेही आणि काळजीनेही.
आता घरट्यात पुन्हा चिमणा-चिमणी. दिवसभरात कधीतरी तो म्हणे, चिव-चिव आणि त्यावर ती म्हणे चिव. मग कधीतरी ती म्हणे चिव-चिव आणि त्यावर तो म्हणे चिव.
कधीतरी चिमण्या चिमणीचा फोन येई. त्यावर तिचा चिवचिवाट सुरू झाला की वाटे ती पुन्हा घरभर फिरते आहे. घर भरले आहे.
या सगळ्याची आठवण देत चिऊ आपल भोवती भुर्रर्रर्रकन्‌  उडतच होती, चिवचिवतच होती. नेहमीची, ओळखीची, खूप सवयीची, आपल्या जगण्याचा भाग असलेली. 
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
आणि अजूनही त्याला कळत काहीच नव्हतं.

Tuesday, March 1, 2011

माणूस आणि चिमणी - २


  
माणूस आणि "चिऊ" नावाची चिमणी
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
एकदा घरातले फोटो साफसफाईला काढले. चिमणा-चिमणी उडून गेले. फोटोमागचे चिमणा-चिमणीचे घरटे खाली पडले. गवताच्या काड्या उसकटल्या. एक उडता न येणारे पिल्लू खाली पडले.
तो धावत पाणी घेऊन आला. कुणीतरी त्याला थांबवले.
माणसाचा हात लागला तर चिमण्या त्या पिल्लाला आपल्यात घेणार नाहीत. ते मरून जाईल.
हे ऐकून त्याला धक्का बसला. त्या त्याला आपल्यात का घेणार नाहीत?
पिल्लू त्याच्या डोळ्यांदेखत मेले. चिमण्याही त्याला वाचवू शकल्या नाहीत. नुसत्याच त्याच्याभोवती फडफडत, तडफडत राहिल्या. चिवचिवत राहिल्या. ते ऐकवत नव्हते.
एक घर उद्ध्वस्त झाले. ... म्हणजे काय? ... का? कुणामुळे?
तेव्हा त्याला ते माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.

एक माणूस आणि एक चिऊ. त्याच्या सतत अवतीभोवती उडणारी, सतत चिवचिवणारी. कळायला लागल्यापासून खूप ओळखीची, सवयीची.
ती आणि इतर पाखरे. चिऊ, काऊ, राघू, मैना, बगळा, बुलबुल, ... ती मोकळी स्वतंत्र पाखरे.
त्यांना माणसाचा हात लागलेला चालत नाही. माणसाचा हात लागला की ...
त्याला धक्का बसला.
इतक्या ओळखीत इतका परकेपणा? इतका अविश्वास, इतकी भीती? ... का?
माणसाचा हात इतका वाईट आहे?
तेव्हा त्याला हे माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.

Monday, February 28, 2011

माणूस आणि चिमणी - १


माणूस आणि चिऊ नावाची चिमणी



एक माणूस होता आणि एक चिमणी होती. तिचं नाव चिऊ. पहिल्यांदा चिऊ त्याला चिऊ-काऊच्या गोष्टीत भेटली.
तेव्हा तो अगदीच छोटं बाळ होता आणि ती जणू त्याची आईच होती.
ती पावसात वाहून न जाणारं मेणाचं घर त्याच्यासाठी बनवणारी, त्याला खाऊ-पिऊ घालणारी, नीटनेटकं टेवणारी, जपणारी, काळजी घेणारी, नेहमी दक्ष, अशी त्याची आई.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
  
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती त्याला अंगणात भेटली. चिऊ-चिऊऽऽ करणारी, उड्या मारत हिंडणारी, दाणे टिपणारी, भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाणारी, पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ येणारी.
तेव्हा घराला अंगण होतं. अंगणाच्या पायरीवर, आजीच्या मांडीवर बसून, चिऊ-काऊची गोष्ट ऐकत, तो तेव्हा चिऊला दाणे टाकत असे. ते खायला ती जवळ येई. नवीन चालत्या, अडखळत्या पावलांनी तो तिला पकडायला धावला की ती पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई. पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ येई.
ती चिऊ-काऊच्या गोष्टीतून उतरून अंगणात आली आणि खरी झाली.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.

एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
मग ती दुसर्‍या गोष्टीत जाऊन बसली. आजोबांची आवडती, न संपणारी गोष्ट.
एक धान्याचं कोठार होत. त्यात अनेक माणसं दर वर्षी धान्य आणून टाकत.
कोठाराला एक छोटी खिडकी होती. तिच्यातून एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
एका वेळी फक्त एकच चिमणी आणि दर वेळी फक्त एकच दाणा. तिच्या छोट्या चोचीत मावेल एवढा. तिचं छोटं पोट भरेल एवढा. अशा अनेक चिमण्या.
एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
धान्याचं कोठार रिकामं होईपर्यंत नवीन वर्षाचं धान्य येऊन ते पुन्हा भरून जाई.
त्या गोष्टीत धान्याचं कोठार कधी रिकामं होत नसे आणि गोष्ट कधी संपत नसे.
आणि तोपर्यंत चिमण्यांना आणि माणसांनाही धान्य कधी कमी पडत नसे.
हे खूपच सुरक्षित आणि समाधानकारक होतं. त्यात एक आश्वासन होतं. चिमण्यांच्या उडण्याचा भुर्रर्रर्रर्रर्र आवाज येतो आहे तोपर्यंत कोठार रिकामं असणार नाही आणि कोणाला काही कधी कमी पडणार नाही अशी श्रद्धा त्यात होती.
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.

एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती एक-एक गवताची काडी घेऊन यायची, खिडकीच्या गजावर बसून आत डोकावायची आणि मग घरात शिरायची.
अशी चिमणीची आणि चिमण्याची घरात भुर्रर्रर्रर्रर्र भुर्रर्रर्रर्रर्र चालू असायची.
त्यांनी घरात आजी-आजोबाच्या हार घातलेल्या फोटोंमागं घरटं बांधलं होतं. घरात घर. 
तेव्हा भिंतींवर आजी-आजोबा, पणजी-पणजोबा आणि देव-देवतांचे खूप फोटो असायचे. त्यांच्या फोटोंमागे चिमण्यांच्या घरट्यांतले आणि त्यांच्या फोटोंतून बघणार्‍या प्रेमळ नजरांसमोर घरांतले संसार फुलायचे. घरभर चिमण्यांचा आणि मुलामुलींचा अखंड चिवचिवाट चालू असायचा. 
त्यांतला एक मुलगा म्हणजे तो असायचा. 
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.